Showing posts with label Kolhapur. Show all posts
Showing posts with label Kolhapur. Show all posts

ग्रेट बाबूराव पेंटर राजाराम महाराजांचं पेंटींग करताना


 

हे भव्य तैलचित्र आजही न्यू पॅलेस येथे आंत गेल्यावर उजव्या हाताला आहे.... वैशिष्ट्य म्हणजे हे तयार केले खरी काॅर्नर येथील कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या घरी तिसऱ्या मजल्यावर.कधी गेला तर पहा अतिशय चिंचोळ्या जिन्यातुन आपणच जाणे अवघडच पण जिथं हे पेंटिंग तय्यार झाले तिथुनच कसंबसं तेवढ्याच जाडीची पोकळी तयार करण्यात आली नि तिसऱ्या मजल्यावरून ते खाली उतरून भव्य जाड फ्रेम जोडुन हे राजवाड्यात नेले..

आठवणीतलं कोल्हापूर. भिशी_फुटते_तेव्हा..

"उद्या संध्याकाळी भिशीमंडळाची भिशी फुटणार आहे. सर्व सभासदांनी भिशी नेण्यासाठी उपस्थित रहावे", गल्लीतल्या वार्ताफलकावर लिहिलेली ही माहीती वाचली आणि मन अलगद भूतकाळात गेले. कोल्हापुरात अशी भिशीमंडळे एक समांतर अर्थव्यवस्था मजबूत करत होती. शहरात वेगवेगळ्या चौकांमध्ये टेबल खुर्ची मांडलेली असायची. भोवतीने मस्तपैकी रांगोळी काढलेली असे. टेबलावर भिशीचं रजिस्टर, पेन, भिशीची पाकिटे असा जामानिमा असे. टेपरेकॉर्डरवर मिथूनची डान्सवाली गाणी वाजत असत. लोकं येतील तसतसे भिशीचं वाटप होई. भिशी फुटली की नोटांची थप्पी असलेलं पाकीट खिशात घालायचं. पाकिटावर मुद्दल, व्याज आणि एकूण रक्कम लिहलेली असे. मग खिसा चाचपत चाचपतच दिवाळी खरेदी उत्साहानं पार पडायची.

पुर्वी बँकांत सेव्हिंग करण्यापेक्षा खाजगी भिश्यांमध्ये पैसे साठवणं सोपं वाटण्याचा तो काळ होता. महिन्याच्या कमाईतून थोडे थोडे पैसे बाजूला ठेवायचे. बचतीची सवयही होवून जाई. गल्लोगल्ली असलेल्या ओळखीच्या भिशीमंडळात दर महिन्याला थोडी बचत करुन दर महिना पन्नास, शंभर अशी रक्कम भरायची. वर्षानंतर दसऱ्याच्या दिवशी किंवा दिवाळीच्या काही दिवस आधी ही भिशी फोडली जाई. दर महिन्याला थोडी बचत करुन भिशीत साठविलेले पैसे ऐन सणाच्या काळात भिशी फुटल्याने हातात खुळखुळत. त्यानंतरच दिवाळी सणाच्या खरेदीची लगबग सुरु व्हायची. त्याशिवाय कुणाच्या हातात एरवी पैसाच राहत नसे. महाद्वार रोड, राजारामपुरीतली कपड्यांची, विविध साहित्याची दुकाने या भिश्या फुटल्यावर ग्राहकांनी फुलून जात.
सबंध शहरात भिशीच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत आली आहे. अपवाद वगळता भिशीचालकांबद्दल वर्षानुवर्षे विश्वासाचे नाते असल्याने या भिशींचे जाळे गल्लोगल्ली दिसायचे. काही ठिकाणी बोफोर्स होई तो भाग वेगळा. कधीकधी कर्जदार कर्जाचे हप्ते वेळेत भरत नसत. ही वसुली अवघड जागेचं दुखणं होवून बसे. मग भिशीचं पैसे सभासदांना ठरलेल्या वेळी परत करताना संचालकांच्या नाकीनऊ येई. पुढे बचत गटांच्या वर्गणीच्या माध्यमातून महिलांना बचतीची सवय लागली. महापालिकेची इलेक्शन आली की, गल्लोगल्ली बचत गट स्थापन होतात. नंतर बंदही पडतात. महिना शंभर रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत वर्गणी घेऊन महिन्याला जमा होणाऱ्या रक्कमेतून गरजू लोकांना कर्जही दोन तीन टक्के व्याजदराने सभासदांना दिले जाते.
भिशीमंडळ आणि बचतगटांकडून सभासदांना वर्षभर जमा केलेल्या रक्कमेवर आकर्षक व्याज, मोती साबण, तेल, सुगंधी उटणे अशा भेटवस्तूही दिल्या जात. मोठमोठ्या बँका दारात उभं करून घेत नसत तेव्हा अर्ध्या रात्रीही भिशीचे चालक केवळ विश्वासावर कर्ज देत. त्यासाठी कागदपत्रांची कटकट नसे. काही तासांतच अडीनडीला कर्ज उपलब्ध झाल्यामुळे या वार्षिक भिशीचा मोठा आधार मिळायचा. त्यामुळेही भिशीचा सभासदांची अधिक पसंती असे. काही भिशीवाले फराळाचेही कुपन देतात.
याशिवाय सुवर्णभिशी हा एक वेगळा प्रकार कोल्हापुरात पहायला मिळतो. बारा महिन्यांपैकी शेवटचा एक हप्ता सोन्याची भिशी चालवणाऱ्या सोनाराकडून भरला जातो. शिवाय सोन्याचा दागिना तयार करायचा झाल्यास सभासदांकडून मजुरी घेतली जात नाही. एकदम सोने घेणं शक्य नसलेल्या लोकांना सुवर्णभिशीमुळे थोडे थोडे करुन दागिने तयार करता येतात.
दर महिन्याला भिशी गोळा करायला एखाद्या ठिकाणी टेबल टाकून रजिस्टर ठेवले जाते. एखादा कार्यकर्ता ही भिशी गोळा करून तिचे व्यवस्थित रेकॉर्ड ठेवतो. ही भिशी फुटते तेव्हा, भिशीच्या ऑफिसात भिशीची पाकीटं तयार करून ठेवलेली असतात. मेंबर्स येतील तसं त्यांची त्यांची पाकीटं देऊन नोंद करून ठेवली जाते. या भिशीच्या सभासदांची दोन तीन महिन्यातून रस्सामंडळ आयोजित केले जाते. काही ठिकाणी सहलींचेही आयोजन होते. महिला मंडळाच्या भिशींमध्ये तर रंगांची थीमही असते. प्रत्येक जणीने एकाच रंगाची साडी नेसून भिशीसाठी एकत्र यायचे. दर महिन्याला प्रत्येकीच्या घरी क्रमवार एकत्र येण्यासाठी भिशीमंडळ हे एक निमित्त होते. जमलेले पैसे चिठ्ठी काढून जिचे नाव येईल तिला बिनव्याजी द्यायचे. पुढच्या महिन्यात त्या महिलेला वगळून उरलेल्या सदस्यात भिशीची चिठ्ठी काढायची. अशी ही भिशी फुटली की, मध्यमवर्गीय कुटुंबातील अर्थव्यवस्था मजबूत होते. मंडळी तुम्हीही अशी भिशी भरली असेल ना..

खरंच....येते का हो ?

 

परवा दुकानात लक्ष्मीपूजनाचे पुढे विकत होतो आणि समोर साक्षात लक्ष्मीच.......

कडेवर तान्हं बाळ... उपाशी असावं...
माझ्यासमोर हात पसरून........ स्तब्ध.. उभी...
माझ्या हातात लक्ष्मीपूजनाचा पुडा,
पुडा बाजूला ठेवला आणि तिच्या हातावर पाच रुपये ठेवले.......
अबब.....केवढं मोठ्ठ समाजकार्य ...!
मनातून लाज वाटली......
हल्ली मनातली लाज तोंडावर न दिसण्याचे कसब अंगात आलंय......
पोराला सावरत लक्ष्मी लाखमोलाचा आशीर्वाद पाच रुपयात देऊन गेली......
मी चित्रकार
लाल भडक रंगाच्या साडीत....
बाजूला दोन पांढरे हत्ती.....
हातात गुलाबी कमळाचे फूल ......
अंगावर पिवळे धम्मक दागिने लेऊन कमळाच्या फुलावर बसायचं सोडून ही लक्ष्मी , कडेवर उपाशी तान्हं बाळ, अंगात करड्या रंगाची फाटकी साडी, दोन्ही हात पसरून भीक मागताना दिसली .......
वाईट नाही वाटलं.... लाज वाटली .
समजत असून काही करू शकलो नाही याची ...
विचार करायला किंवा कृती ( ? ) करायला वेळच नव्हता..
लक्ष्मीपूजनाचा दिवस होता ........
दुकानात ही गर्दी......................
संध्याकाळची वेळ....................
बसलो पूजेचे पुढे विकत............
संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी घरात येते...........
........................ असं म्हणतात
खरंच....येते का हो ?


BY RAHUL REPE, KOLHAPUR.

MARATHI KAVITA


 

फोटोग्राफर

 

मोबाईल ने घातला फोटोग्राफर वर घाव

त्यातच खेळला करोनाचा डाव 
किरकोळ कामे झाली हद्दपार 
नसे कोणाला काम
रोज येती नित्य नवे कॅमेरे
व्हा अपडेट मिळतील कामे
ऋण काढून सण साजरे करणे
घेऊन नवे कॅमेरे  तरी 
म्हणती आम्ही रिकामटेकडे 
असेल काही काम तर 
सांगा आम्हा पटकन
ज्युनिअर सिनिअर सगळे बसले 
एका पंक्तीत मागाया काम
मांडेल कैफियत सरकार दरबारी 
फोटोग्राफर असोसिएशन 
जुगारुन असोसिएशन रेट
लावती मनमानी थेट
भरली आपली खळगी दाखवू रूबाब वरती
नसे त्यांच्यात एकी म्हणून मरती उपाशी 
हीच खरी व्यथा आहे एका सच्या फोटोग्राफरची

     सौ. रोहिणी अमोल पराडकर 
           कोल्हापूर 8208890678

पन्हाळा

 



पन्हाळा महाराष्ट्रातील एक इतिहासप्रसिद्ध किल्ला, थंड हवेचे ठिकाण व कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य स्थान. लोकसंख्या २,२१९ (१९७१). कोल्हापूरच्या वायव्येस सु. १८ किमी. वर कोल्हापूर-रत्नागिरी हसरस्त्याच्या दक्षिणेस सह्याद्रीच्या कुशीत एका छोट्याशा पठारावर वसले आहे. त्याची स. स. पासून उंची ८४५ मी. असून थंड हवा व रोगप्रतिबंधक पाणी यांकरिता ते प्रसिद्ध आहे.

पन्हाळ्याचे दोन स्वतंत्र भाग आहेत. एक पन्हाळा किल्ला अथवा हुजूर बाजार आणि दुसरा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला रविवार, मंगळवार, गुरुवार, इब्राहीमपूर हा पेठांचा भाग. किल्ल्याचा परिघ ७.२५ किमी. आहे.
पन्हाळ्याचा एकूण परिसर हिरव्यागार वनश्रीने विनटलेला असून पावसाळा सोडून इतर ऋतूंत येथील हवा आल्हादकारक असते. पन्हाळा किल्ला केव्हा व कोणी बांधला यांविषयी निश्चित माहिती ज्ञात नाही. त्याच्या बांधकामासंबंधी काही दंसकथा प्रचलित आहेत; तथापि कोरीव लेख व करवीर पुराण यांतून पन्हाळ्याचे प्रणलाक, पन्नाळे, पर्णाल, पन्नागालय वगैरे नामोल्लेख आढळतात. शिलाहार राजा दुसरा भोज (११७५-१२१२) याची राजधानी येथे होती. त्याने पंधरा किल्ले बांधले अशी आख्यायिका आहे. त्यांपैकी पन्हाळा हा एक असावा. त्यानंतर यादव, बहमनी राजे, आदिलशाही, मराठे, मोगल व पुन्हा मराठे यांच्या सत्तांखाली पन्हाळा होता.
आदिलशाही काळात किल्ल्याची डागडुजी झाली, तटबंदी व दरवाजेही नवीन बांधण्यात आले. शिवाजी महाराजांनीही किल्ल्यात काही सुधारणा केल्या. शिवाजी महाराजांना सिद्दी जोहारने वेढा दिला तो या किल्ल्यातच आणि महाराजांनी संभाजीस कर्नाटकाचा कारभार करण्यासाठी ठेवले तेही याच किल्ल्यात. ताराबाईने कोल्हापूरची गादी स्थापन केल्यानंतर पन्हाळा ही राजधानी केली. दरम्यान शाहूने काही दिवस पन्हाळ्याचा कबजा घेतला होता. कोल्हापूरचे छत्रपती शहाजी यांच्या वेळी (१८२१-३७) पन्हाळा ब्रिटिशांना काही वर्षें दिला ; पण पुढे स्वातंत्र्यापर्यंत तो कोल्हापूर संस्थानाच्या अखत्यारीत होता.
पन्हाळ्यावरील अनेक ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त झाल्या आहेत. चार दरवाजा, राजवाडा अशा काही वास्तूंचे केवळ पाये वा भग्नावशेष दृष्टोत्पत्तीस येतात. सुस्थितीतील अवशिष्ट वास्तूंत तीन दरवाजा, वाघ दरवाजा ही प्रवेशद्वारे; गंगाकोठी, धर्मकोठी आदी बालेकिल्ल्यातील धान्यकोठारे; सज्जाकोठी, नायकिणीचा (कलावंतिणीचा) सज्जा (जीर्ण वास्तू) या तटबंदीवरील वास्तू ;संभाजी व जिजाबाई मंदिरे, रामचंद्रपंत अमात्यांची समाधी, सदोबा मुसलमानाचा दर्गा ही धर्मस्थळे आणि शृंगार (अंधार), बाव ही विहीर इ. प्रसिद्ध व कलापूर्ण आहेत. ख्यातनाम संतकवी मोरोपंत यांचा जन्म या स्थळी झाला आणि त्यांचे सुरुवातीचे सु. २४ वर्षांपर्यंतचे वास्तव्य या ठिकाणी होते. सदोबा मुसलमानाच्या दर्म्याप्रीत्यर्थ दरवर्षी येथे उरूस भरतो.
*जय शाहू महाराज*,*जय छत्रपती शिवाजी महाराज*, *जय संभाजी राजे*; *जय राजाराम महाराज*,. *जय महाराणी ताराबाई*.
तबक उद्यान, जवाहरलाल नेहरू उद्यान व नागझरी ही ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधुनिकीकरण केलेली तीन सुरेख पर्यटन स्थाने आहेत. यांशिवाय येथील माध्यमिक शाळा, ग्रंथालय, सरकारी कार्यालये व रुग्णालय, राष्ट्रीयीकृत बँका व आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज असलेली निवासस्थाने आणि आलिशान आहारगृहे स्वच्छता व टापटिपीसाठी ख्यातनाम आहेत.
येथे १९५४ पासून नगरपालिका आहे. महाराष्ट्र शासनाने पन्हाळ्यास गिरिस्थानाचा दर्जा दिल्यापासून शहरात गटारे, डांबरी रस्ते, विहिरी, बागबगीचे, सुटी-निवासस्थाने (हॉलिडे होम्स) वगैरे विविध सुधारणा झपाट्याने झाल्या. पन्हाळ्यावर अनेक चित्रपटनिर्माते, सिनेकलावंत, राजेरजवाडे यांचे टुमदार बंगले आहेत. येथील नयनमनोहर सृष्टिसौंदर्य व ऐतिहासिक वास्तू यांचा अनेक चित्रपटनिर्मात्यांनी चित्रपटांत उपयोग केला आहे.
संग्रहित.
सौ निर्मला शिंदे पाटील.
एक्स उप प्राचार्या
लेखिका कवयित्री

photo credit - toufique shaikh. kolhapur.

Kolhapur Photography

Photography work on the Birds by Kolhapur Photography facebook group. 

Check out Awesome Photography work and Images by Kolhapur Photographers.

Kolhapur Photography : BIRDS












.

GUL SOUDE

कोल्हापुरात शेतकर्यांचा एल्गार !!

कोल्हापुरात मार्केट यार्डात पाडव्याच्या मुहूर्तावर शेतकर्यांनी गुळाचे सौदे बंद पाडले . जादा दराचे आमिष दाखवून , अगदी काही किलो गूळ जास्त भावाने विकण्याचे व्यापार्यांचै "नाटक "संतप्त शेतकर्यांनी हाणून पाडले
.
साधारण दरवर्षीच गुळ व्यापारी शेतकर्याँची अशाप्रकारे फसवणूक करीत असतात. मार्केट यार्डात आलेल्या गुळापैकी काही किलोच गूळ अगदी शेतकर्यांच्या कल्पने पलीकडे जादा दराने खरेदी करावयाचा आणि उरलेला गूळ कवडीमोलाने विकायचा ,असा प्रकार केला जातो .

सूज्ञ शेतकर्यांनी हा प्रकार उधळून लावला .........एक चांगली सुरवात !!
दिवाळी झाली आता ऊस दराची अन् आंदोलनाची आतषबाजी सुरु झाली ......

गेल्या काही वर्षात ऊस दराच्या आंदोलनाने चांगलाच जोर धरला आहे . उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावा ,अशी शेतकर्याँची मागणी असत .गेल्या काही काळात रासायनिक खते , पाणीपट्टी ,मशागत अशा कामात सुमारे तिपटीनै वाढ झाली ही वस्तुस्थिती आहे; परंतु उसाला मिळणाऱ्या दरात मात्र त्या प्रमाणात वाढ झाली नाही.

साखर कारखाने सुरु होण्याच्या अगोदरच शासनाकडून दर का निश्चित केला जात नाही ? हा एक प्रश्नच आह.े आतातर ' एफआरपी' चा मुद्दा पुढे रेटला जात आहे . ही एफआरपी च नेमकी काय 'भानगड ' हे पहावे लागेल .....

साधारण दोन वर्षापूर्वी एफआरपी होती १४५० रुपये . ती गतवर्षी झाली १७५० रुपये ! ज्यावेळी १४५० एफआरपी होती त्यावेळी आंदोलन झाले आणि शेतकऱ्यांना २००० ऊसदर मिळाला . ज्यावेळी १७५० एफआरपी झाली , त्यावेळी दर मिळाला २५०० रुपयांच्या वर !

काही जण सांगतात आम्ही एफआरपी पेक्षा जास्त दर दिला , तर काहीजण साखरेचा खुल्या बाजारातील दराचे अर्थकारण जोडतात. काहीअंशी ते खरेही आहेच , पण कारखान्यांना इतर उप पदार्थाचे उत्पन्न मिळतेच.
आता प्रश्न निर्माण होतो, कि साखर कारखान्यातील अनेक गैरव्यवहार थांबवले तर कारखान्याचे पर्यायाने ऊस उत्पादकांचे हित होईल मात्र हा पुन्हा वादातीत विषय !!

काही झाले तरी एफआरपी पेक्षा जादा दर देणे शक्य आहे हे सिद्ध होत.े मग यावर्षी पुन्हा साखरेचे दर, बँकेचे कारण आणि धोरण पुढे करुन आंदोलनाची सुरवात खरेतर शासनाकडून च होत आहे ,हे मान्य करायला हवे .

एफआरपी हा पाया धरून ऊसदर ठरत असेल तर इतर राज्यात दर जास्त दिला जातो मग महाराष्ट्रात का मिळत नाही ? हाही प्रश्न आहेच ?
ऊसदर , आंदोलन करुनच पदरात पाडून घ्यायला शेतकऱ्यांना हौस नक्कीच नाही . आणि शासनाने ही अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी.....

कि एफआरपी च ही एक भानगड आहे , हे तरी कळायला च हवे.........

KOLHAPURI

पुण्यामध्ये पत्ता शोधायचा, विचारायचा तर"जोशी कुठं राहतात 'हे इथं विचारू नये' अशी पाटी वाचायला मिळते. कोल्हापुरात मात्र बरोबर याच्या उलट दृश्य पाहायला आणि अनुभवायला मिळतं. चौकात किंवा कोपऱ्यावरउभ्या असलेल्या मंडळींना पत्ता विचारला तर ते त्या व्यक्तीची इतर माहिती विचारतील आणि एकमेकांत सांगतील.. "अरे,त्या बॉबकटचा बाबा रे! काळं गिड्डं रे ते!'' हे पत्ता विचारणाऱ्याच्यासमोर होऊ शकतं. त्यापुढे पत्ता सांगून रिकामे."हे बघा, सरळ-स्ट्रेट जावा. पुढं एक गोल-सर्कल लागंल, तितनं लेफ्ट मारा (चालतानासुद्धा!). त्या बोळात एकपायपीचा (ट्यूबलाइटचा) डांब (खांब) लागंल.त्याच्या जरा पुढं गेला कीपाण्याची चावी (नळ) दिसंल. तिथंबायका हायेतच; त्या त्यांच्याच!' 'एवढं ऐकून गोंधळलेला पाहुणा आणखी गोंधळू नये म्हणून एखाद्या लहान मुलाला "ए बारक्या,जा ह्यास्नी सोडून ये,'' असं सांगणार. हे सगळं"आपल्या गल्लीत' आलेल्या पाहुण्यांसाठी, हे लक्षात घ्यायचं. ते पाहुणे परत जाताना पुन्हा दिसलेच, तर"पावनं,गावलं नव्हं घर?'' असं आवर्जून विचारणार आणि रिक्षाला हाक मारून पाहुण्यांना त्यात बसवून निरोप देणार."पायीप' म्हणजे ट्यूबलाइट, डांब म्हणजेखांब, चावीम्हणजे नळ...असे बरेच शब्द हे खास कोल्हापुरी शब्दकोशातले, हे समजलं असेलच.त्याचबरोबर अनेक समानार्थी शब्द,वाक्प्रचार, विशेषणं वगैरेंचा स्वतंत्र कोश आहे; पण तो केवळ मौखिक असल्याने समजून घ्यावा लागतो वा अभ्यासण्यासाठी इथंच जन्म घेऊन लहानाचं मोठं व्हावं लागतं........

Marathi Abhiman Geet

मराठी अभिमान गीत.........


लाभले  आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी
जाणतो मराठी, मानतो मराठी
दंगते मराठी, रंगते मराठी,
स्पंदते मराठी, गर्जते मराठी
गुंजते मराठी, गर्जते मराठी

आम्ही कोल्हापुरी .........

प्रसिध्दीपासून दूर राहिलेली तरीही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वत:चा लौकिक टिकवून राहिलेलं पादत्राण म्हणजे आपली कोल्हापुरी चप्पल!

माणसानं जे काही शोध लावलं त्यातला पादत्राणाचा शोधही महत्त्वाचा. पायाला बोचणाऱ्या दगडांचा, काट्यांचा त्रास चुकविण्यासाठी आदिमानवाच्या काळात पायाला पाला किंवा झाडाची साल बांधण्याची पध्दत होती. ग्रीस, इजिप्त या देशातील उत्खननात त्यावेळची पादत्राणे मिळाल्याचा उल्लेख आढळतो. इ. स. पूर्व काळात पादत्राणे वापरली जात. नंतरच्या काळात मेलेल्या किंवा मारलेल्या प्राण्यांच्या चामड्याला योग्य आकार देऊन ते पायाला बांधले जाई.

भारतातील पादत्राणासंबंधी वैदिक वाड्:मयात उल्लेख आढळतो. रोमनकालीन पादत्राणांशी त्याचं साम्य आढळतं. पुणेरी जोडा, जयपुरी चढाव याबरोबरच कोल्हापुरी चपलांची निर्मिती झाली. पुणेरी जोडा जरी जवळ जवळ नाहीसा झाला तरी जयपुरी चढाव आणि कोल्हापुरी चप्पल मात्र टिकून आहेत. कोल्हापुरी चपलांची जुनी नावं म्हणजे खास कोल्हापुरी, खास कुरुंदवाडी, खास कापशी! गावांच्या नावावरुन दिलेली. शिवाय पुडा मोरकी, पुडा पॅचिंक, पुडा अथणी, गांधीवादी अशी नावे अलिकडच्या बदलत्या काळात म्हणजे चित्रपटांच्या जमान्यात कोल्हापुरी चपलेने सुरक्षा, सिलसिला, सुहाग, जंजीर, नाचे मयूरी, दिल, मेरी आवाज सुनो, महाभारत अशीही नावे धारण केली असली तरी आपला मूळचा दर्जा व वैशिष्ट्ये कधीच सोडली नाहीत.

कोल्हापूरी चप्पल पूर्णत: कातड्याची असल्याने उन्हाळयातसुध्दा थंडपणा जाणवतो. शिवाय चालताना त्रास होत नाही. कारण त्या पूर्णत: हाताने बनविलेल्या असतात. त्या बनविण्याचे ९० ते ९५ टक्के काम महिला कामगार करतात. कोल्हापूर जिल्ह्यात या चपला तयार करुन उपजीविका करणारी साधारणत: सात हजारावर कुटुंबे आहेत. चपलांची किंमत वापरलेल्या कातड्याच्या दर्जाप्रमाणे असते


AAMHI KOLHAPURI