Showing posts with label Marathi Kavita. Show all posts
Showing posts with label Marathi Kavita. Show all posts

खरंच....येते का हो ?

 

परवा दुकानात लक्ष्मीपूजनाचे पुढे विकत होतो आणि समोर साक्षात लक्ष्मीच.......

कडेवर तान्हं बाळ... उपाशी असावं...
माझ्यासमोर हात पसरून........ स्तब्ध.. उभी...
माझ्या हातात लक्ष्मीपूजनाचा पुडा,
पुडा बाजूला ठेवला आणि तिच्या हातावर पाच रुपये ठेवले.......
अबब.....केवढं मोठ्ठ समाजकार्य ...!
मनातून लाज वाटली......
हल्ली मनातली लाज तोंडावर न दिसण्याचे कसब अंगात आलंय......
पोराला सावरत लक्ष्मी लाखमोलाचा आशीर्वाद पाच रुपयात देऊन गेली......
मी चित्रकार
लाल भडक रंगाच्या साडीत....
बाजूला दोन पांढरे हत्ती.....
हातात गुलाबी कमळाचे फूल ......
अंगावर पिवळे धम्मक दागिने लेऊन कमळाच्या फुलावर बसायचं सोडून ही लक्ष्मी , कडेवर उपाशी तान्हं बाळ, अंगात करड्या रंगाची फाटकी साडी, दोन्ही हात पसरून भीक मागताना दिसली .......
वाईट नाही वाटलं.... लाज वाटली .
समजत असून काही करू शकलो नाही याची ...
विचार करायला किंवा कृती ( ? ) करायला वेळच नव्हता..
लक्ष्मीपूजनाचा दिवस होता ........
दुकानात ही गर्दी......................
संध्याकाळची वेळ....................
बसलो पूजेचे पुढे विकत............
संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी घरात येते...........
........................ असं म्हणतात
खरंच....येते का हो ?


BY RAHUL REPE, KOLHAPUR.

MARATHI KAVITA


 

फोटोग्राफर

 

मोबाईल ने घातला फोटोग्राफर वर घाव

त्यातच खेळला करोनाचा डाव 
किरकोळ कामे झाली हद्दपार 
नसे कोणाला काम
रोज येती नित्य नवे कॅमेरे
व्हा अपडेट मिळतील कामे
ऋण काढून सण साजरे करणे
घेऊन नवे कॅमेरे  तरी 
म्हणती आम्ही रिकामटेकडे 
असेल काही काम तर 
सांगा आम्हा पटकन
ज्युनिअर सिनिअर सगळे बसले 
एका पंक्तीत मागाया काम
मांडेल कैफियत सरकार दरबारी 
फोटोग्राफर असोसिएशन 
जुगारुन असोसिएशन रेट
लावती मनमानी थेट
भरली आपली खळगी दाखवू रूबाब वरती
नसे त्यांच्यात एकी म्हणून मरती उपाशी 
हीच खरी व्यथा आहे एका सच्या फोटोग्राफरची

     सौ. रोहिणी अमोल पराडकर 
           कोल्हापूर 8208890678

MARATHI KAVITA

दोघांचं सकाळी भांडण होण
तरी जाताना एकमेकान कडे बघण
ऑफिस मध्ये बसून एकमेकांची आठवण काढण
आणि हळूच लंच मध्ये एक मिस काल देण
मी कॉल केल्यावर चुकून लागला म्हणन
आणि ऑफिस मधून येताना माझ्यासाठी गुलाबाची फुले घेण
उगीच मला घरी पोचण्य आधी रस्त्यात भेटायला बोलावण
आणि मग गुलाबाची फुले देऊन खुश करण
दोघांनी घरी जाण्या आधी हॉटेल मध्ये कॉफी पिण
अश्या आठवणी येऊ लागल्या कि अवघड होत
वर्तमाना कडे बघण
आणि मग विचार येतो
पुसटशी तरी आठवण येत असेल कधी तुलाही..................

MARATHI KAVITA

मी म्हंटले मित्राला एकदा
मला प्रेमात पडायचय
कोणीतरी आपल्यावर खूप प्रेम करतं
असलं काहीतरी अनुभवायचाय

मित्र म्हणाला
आरशात बघ न जरा
स्वतःवर प्रेम करायचं शिक जरा
मग बघ किती सुंदर हि धरा

मग मी थोडी विचारात पडले
डोळ्यातून दोन थेंब हि गळले

विचार केला
स्वतःवर प्रेम करायचं कसं?
एकटच प्रेमात पाडायचं कसं?
इतके थेंब अंगावर पडतात
पण एकटच पाऊसात भिजायचं कसं?

मराठी

=तुळशी" ची जागा आता "Money Plant" ने
घेतलीय...!!
="काकी" ची जागा आता Aunt ने घेतलीय...!!
=वडील जिवंतपणिचं"डैड" झाले, अजुन बरचं काही आहे
आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले....??
=भाऊ "Bro" झाला आणि बहीण "Sis"...!!
=दिवसभर मुलगा CHATTING चं करतो... नाही तर
रात्री झोपताना Mobile वर SETTING पण करतो...!!
=दुध पाजणारी आई जिवंतपणीचं "Mummy"
झाली...!!॥
=घरची भाकरं आता कशी आवडणार हो... ५ रु. ची Maggi
आता किती"Yummy" झाली...!!
=माझा मराठी माणूसच मराठी ला विसरू लागलाय....
----बघा जमल्यास विचार करुन शेअर करा व
आपली संस्कृती.लोप पावण्यापुर्वी ती जपण्याचा प्रयत्न
करा ...!!!!!!!!!

MARATHI KAVITA - DIWALI SHUBHECHA

आभाळाच्या सावलीत....आपली माणसं शोधायची....
थोडी आधीच जोडलीयत....अजून थोडी जोडायची...

हसून जगायचं शहाण्यासारखं...मनं नाही मोडायची...
वेड्या अंधाराची जळमट ह्या प्रकाशाने तोडायची...

आयुष्याच्या पटलावरती इच्छांची कधीच कमी नसते....
खूप काही मिळूनही...अजून खूप काही हवे असते.... 

पुरे होवो तुमच्या हरेक इच्छा....
दिपावलीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा..... 

अस काहीस मागण देवाकडे मागत 
सुगी संपली कि आलुतेदार -बलुतेदार मंडळी बाहेर पडतात 
दिवाळीची पोस्त गोळा करायला …

HAPPY DIWALI



आभाळाच्या सावलीत....आपली माणसं शोधायची....
थोडी आधीच जोडलीयत....अजून थोडी जोडायची...

हसून जगायचं शहाण्यासारखं...मनं नाही मोडायची...
वेड्या अंधाराची जळमट ह्या प्रकाशाने तोडायची...

आयुष्याच्या पटलावरती इच्छांची कधीच कमी नसते....
खूप काही मिळूनही...अजून खूप काही हवे असते.... 

पुरे होवो तुमच्या हरेक इच्छा....
दिपावलीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा..... 

अस काहीस मागण देवाकडे मागत 
सुगी संपली कि आलुतेदार -बलुतेदार मंडळी बाहेर पडतात 
दिवाळीची पोस्त गोळा करायला …

MARATHI KAVITA

रोजच्याच परी, सकाळ कोवळी
विरह मनास, जीव हा तळमळी
चडली प्रीतीवर निराशेची काजळी
सखे ऐक न, मनाची आर्त आरोळी

राग नाही बरा, रुसलीस का अवखळी
प्रेमात मी तुझ्या असे, किती ग प्रांजळी
मन भरून येते, रितीच असतील ओंजळी
किती विनवू तुला, का चिडतेस वेळो-वेळी

तुजवीण ग, जीवनात एक पोकळी
जाणून आहेस, तरी खेळतेस हि खेळी
का उगाच, छटा दावितेस अशी वेगळी
ये परत तू, बघ राहील हा मी निर्जळी ....




Written By : Anamika Author

Random thoughts (in Marathi)


prahari vajanarya alarm la shanth karave mhanto, tya jast zhopnyala thoda vel dyava mhanto

sakalchya dhandlit thodi excercise karavi mhanto, eka maghe ek paaul takat thode jog karave mhanto

office madhye velat pohchave mhanto, boss chya observations na challenge karave mhanto...ya process madhye thode kaam karane hi enjoy karave mhanto

mitranshi honarya phone calls chi frequency vadvavi mhanto, tya gappa gosthi na aankhi thoda vel dyava mhanto

office kamatun sutti ghyavi mhanto...k ek varsh 'valley of flowers' la jave mhanto

divschya gadbadi madhye thoda pause ghyava mhanto...tya pause madhye thode swatala samjhun ghyave mhanto...ya samajnya va n samjnya madhye aayush jagave mhanto

माणसं भेटतात...प्रसंग आठवतात....

माणसं भेटतात...प्रसंग आठवतात....
मनात भावनांची गर्दी झाली कि शब्द अबोल होतात,
बुद्धी परकी होते....फक्त आपल्यासाठी का होईना काळाचं चक्र थांबतं...

खूप काही बोलायचं असतं, पण नेमक्या शब्दात मांडणं कठीण होऊन जातं.
काय सांगावं,कसं सांगावं, काय आधी सांगावं, सांगितलंच पाहिजे का...?
हे विचार करता करता सगळंच सांगायचं राहतं.

युद्धभूमीवर सामान्य सैन्य पुढे करून राजाने मागून सगळं रणांगण पहावं तसं
शब्दांच्या गिचमिडीत नेमके हवे तेच शब्द मागे राहतात...
मग जाणवतं कि,
जे शब्द ओठातून निसटतात...ते अगदी शुल्लक असतात.....
जे लपून राहतात....ते खरे योद्धे असतात...त्यांनी लढायला हवं होतं...

घुमटामध्ये आवाज घुमतो...प्रतिध्वनी ऐकू येतो....पण....
घुमट समजून खुल्या आभाळाखाली जोरात किंकाळी मारून प्रतिध्वनीची वाट पाहण्यात काही अर्थ नसतो,
आपलाच आवाज आपल्याला परत ऐकू येत नाही.....
येईलच कसा....?
परत यायला आवाजही आभाळाच्या संपण्याची वाट पाहत धावत असतो....पण आभाळ संपतच नाही....
आभाळ हि अनंताकडे स्वतःचा अंत मागत असतं......
आवाज काही परत येत नाही....आणि....वाट पाहणाऱ्याची वाट पाहणं हि संपत नाही.....
मग एकटेपणाशी भेट होते.....

"वर्तमानात आवडत्या माणसाला वेळ नाही दिला कि,भविष्यातला बराचसा वेळ एकटेपणाला द्यावा लागतो...सो आज जी माणसे भेटल़ी त्यांना सर्वाना धन्यवाद.......