"जी माणसे हवीशी वाटतात,
ती कधी भेटत नाहीत..."
"जी नकोशी वाटतात,
त्यांचा सहवास संपत नाही..."
"ज्यांच्याकडे जावेसे वाटते,
त्यांच्याकडे जायला जमत नाही..."
"ज्यांना टाळावेसे वाटते,
त्यांच्याकडे जावेच लागते..."
"जेंव्हा जीवन नकोसे वाटते,
तेंव्हा काळ संपत नाही..."
"जेंव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो,
तेंव्हा काळ निसटलेला असतो..."
"नशीब हे असेच असते,
त्याच्याशी जरा जपूनच वागावे लागते "
"तिथे कोणाचेच चालत नाही,
जिकडे नेईल तिकडे जावेच लागत..
शेवटी काय..!
नाती जपण्यातच मजा आहे,
बंध आयुष्याचे विणण्यातच मजा आहे,
जुळलेले सूर गाण्यातच मजा आहे,
येताना एकटे असलो तरी,
सर्वांचे होऊन जाण्यातच मजा आहे.
"नशीब" कोणी दुसरं लिहित नसतं,
आपल नशीब आपल्याच हातात असतं,
येताना काही आणायच नसतं,
जाताना काही न्यायचं नसतं,
मग हे "आयुष्य" तरी कोणासाठी जगायचं
असतं..?
याच प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठीच तर "जन्माला" यायचं
असतं...