कारागृहातील बंदी ठरला लेखणी सम्राट



कोल्हापूरातील कळंबा कारागृहात शिक्षा भोगत असतानाही बंदी गजानन खडके यांनी आपल्या लेखनशैलीतून स्वतःचे वेगळेपण दाखवून दिले आहे हुपरी येथील श्री साई बहूउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या हुपरी लेखणी सम्राट -२०१० या राज्यस्तरीय खुल्या गटातील निबंध स्पर्धेत श्री. खडके यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.

हातून घडलेल्या गुन्हयांमुळे कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाही गजानन बाळासाहेब खडके यांनी आपली लेखन कला सुरु ठेवली आहे. हुपरी लेखणी सम्राट या स्पर्धेसाठी त्यांनी ' फॅशनचे वाढते स्वरुप व भारतीय संस्कृती ' या विषयावर निबंध सादर केला होता. संस्थेतर्फे त्यांना रोख १ हजार ५०० रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कळंबा कारागृहाचे अधीक्षक जे. एस. नाईक यांनी खडके यांचे पुणे येथील अप्पर पोलीस महासंचालक, (कारागृह) संजयकुमार वर्मा यांच्यातर्फे अभिनंदन केले व लेखन कलेस चालना दिली. कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी एम.एन.कांबळे, डी.जी. गावडे तसेच शिक्षक एस.आर.जाधव व एच.बी.बिराजदार यांनी गजानन खडके यांना मार्गदर्शन केले

अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कृती कार्यक्रम -- परिवहन आयुक्त दिलीप जाधव



कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील वाहन अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अंमलबजावणी कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. दि. १ जानेवारी ते १५ जानेवारी २०११ या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय अािण पोलीस विभागामार्फत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त दिलीप जाधव यांनी आज दिली.
राज्य रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यासाठी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधिक्षक यशस्वी यादव, प्रादेशिक परिवहन अधिकारी, डी. टी. पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्ग मदने, प्रशांत शिंदे तसेच कोल्हापूर परिवहन विभागातील सांगली व सातारा जिल्ह्यातील परिवहन अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
अपघाताचे प्रमाण कमी करण्याबरोबरच वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळावेत, यासाठी परिवहन विभागाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेतल्याचे सांगून श्री. जाधव म्हणाले, कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करणार्‍या बैलगाडया, टॅक्टर ट्रेलर्स तसेच ट्रक या वाहनांतून भार क्षमतेपेक्षा तसेच धोकादायक स्थितीत ऊसाची वाहतूक करताना आढळून आल्यास अशा वाहनांवरती कडक कारवाई करण्यात येईल. ऊस वाहतूक करणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांचे अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग, सिमा तपासणी नाके तसेच विविध साखर कारखान्यांच्या परिसरात वाहनांना लाल परावर्तक लावण्याची मोहीम या कालावधीत राबविण्यात येणार आहे. महामार्गावरुन चूकीच्या दिशेने येणार्‍या वाहनांवरती कारवाई करण्यात येणार आहे. भारक्षमतेपेक्षा जादा मालाची, प्रवाशांची वाहतूक न करण्याबद्दल वाहतूक व्यावसाईक संघटनांचे प्रतिनिधी, तसेच रिक्षा युनियन प्रतिनिधी, एस.टी. चे विभाग नियंत्रक तसेच के.एम.टी. व्यवस्थापनास कळविण्यात येणार असून वाहन अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी या कालावधीत अशा वाहनांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर वेग मर्यादेचे उल्लंघन करुन वाहन चालविणार्‍या तसेच मद्य सेवन करुन चालविणार्‍या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहन चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी तसेच त्यांना सुरक्षित वाहतूक नियमांची आणि चिन्हांची माहिती देण्याकरिता एन.सी.सी., एन.एस.एस. यासारख्या संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. शैक्षणिक संस्थामधील प्राध्यापक, स्पोर्टस्‌ प्रशिक्षक, खाजगी सुरक्षा अधिकारी, माजी सैनिक,गृह रक्षक दल, साखर कारखान्यांचे सुरक्षा अधिकारी, निवृत्त पोलीस, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी संपूर्ण वर्षामध्ये ट्रेनर्स ट्रेनिंग उपक्रम राबविण्यात येणार असून त्यांच्या सहाय्याने वाहन अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी तिन्ही जिल्ह्यातील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालयात दर महिन्यातून एक दिवस बैठक आयोजित करण्यात येणार आहे, असेही सांगितले.

पोलीस अधीक्षक यशस्वी यादव यांनी वाहतूकीत सुरळीतपणा आणण्यासाठी आयोजिलेल्या विविध उपायांची माहिती देताना सांगितले, नव वर्षाचे स्वागत करतांना वाहन चालकांनी वाहतूकीचे नियम व शिस्त स्वयंस्फूतर्ीेने पाळल्यास अपघाताच्या प्रमाणात निश्चितच घट होईल. वाहतूकीस शिस्त लावण्याच्या दृष्टीने कोल्हापूर पोलीस विभागाने फेस बुक या सोशल वेबसाईटवर फेंडस्‌ ऑफ कोल्हापूर पोलीसची निर्मिती केली असून वाहतूकीचे नियम मोडणार्‍या वाहनांचे व्हिडीओ चित्रीकरण अथवा छायाचित्रे या वेबसाईटवर पाठविल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. मद्य प्राशन करुन वाहन चालविणार्‍या वाहन चालकांवर वाहन परवाना जप्ती तसेच दंडात्मक कारवाई केली जाईल. बाहेर गावाहून येणार्‍या पर्यटकांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना पोलीस दलाला करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

रस्ता सुरक्षाअभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

सन २०११ पासून दि. १ ते ७ या कालावधीत राबविण्यात येणार्‍या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या कालावधीत वाढ करुन तो दि.१५ जानेवारी पर्यंत राबविण्यात येणार आहे. वाहनधारकांना आपल्या जुन्या वाहनाचा नोंदणी क्रमांक नवीन वाहनांवर नोंद करण्यासाठी नंबर पोर्टबिलीटी सुविधा सुरु करण्यात आली आहे. वरील तिन्ही जिल्ह्यात वाहतूकीस सुरक्षित आणि अपघात विरहित किंवा अपघातांचे प्रमाण अत्यंत कमी असलेला रस्ता आणि घाट याचा शोध घेऊन तो रस्ता किंवा घाट तयार केलेल्या अभियंत्याचा रस्ता सुरक्षा समिती मार्फत सत्कार करण्यात येणार आहे. एस.टी., के.एम.टी. रिक्षा,टॅक्सी, ट्रक या व्यवसायातील विना अपघात वाहन चालविणार्‍या चालकाचा खास प्रमाणपत्र देऊन रस्ता सुरक्षा समितीमार्फत सत्कार करण्यात येणार आहे. तिन्ही जिल्ह्यातील कॅम्पचे ठिकाणी शिकाऊ तसेच पक्क्या लायसन्ससाठी येणार्‍या उमेदवारांना सुरक्षित वाहतूकीच्या नियमांची तसेच चिन्हांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच खाजगी वाहनातून होणारी अवैध प्रवासी वाहतूक, घरगुती वापराच्या गॅसचा इंधन म्हणून वापर करणार्‍या रिक्षा, भार क्षमतेपेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक करणार्‍या काळी, पिवळी टॅक्सी यासारख्या वाहनांची या कालावधीत विशेष तपासणी म्हणून राबविण्यात येणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्याची २०० कोटीची वार्षिक योजना अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ४८ कोटी प्रस्तावित ( Kolhapur Budget 2010)








कोल्हापूर जिल्ह्याचा सन २०११-१२ च्या २०० कोटीच्या प्रस्तावित प्रारुप आराखड्यास आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.अनुसूचित जाती उप योजनेच्या (विघयो) ४८ कोटी ९ लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यासही यावेळी मंजुरी देण्यात आली.पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज ताराराणी सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली.
या बैठकीस गृह व ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील,जिल्हा परिषद अध्यक्षा यशोदा कोळी,खासदार सदाशिवराव मंडलिक,आमदार सर्वश्री सा.रे.पाटील,भगवान साळुंखे,चंद्गकांतदादा पाटील,सुरेश हाळवणकर,चंद्गदिप नरके,राजेश क्षीरसागर,के.पी.पाटील,प्रभारी जिल्हाधिकारी तुकाराम कासार,महापालिका आयुक्त विजय सिंघल,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जयश्री भोज,जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश गिरी,तसेच नियोजन समितीचे सदस्य व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
राज्याच्या वित्त व नियोजन विभागाने कोल्हापूर जिल्ह्याच्या विकास आराखड्यासाठी १३७ कोटी २५ लाख रुपयांची मर्यादा निश्चित केली होती.विविध शासकीय विभागांची जादा निधीची मागणी लक्षात घेऊन जिल्ह्याच्या सन २०११-१२ च्या सर्वसाधारण योजनेमध्ये ६२ कोटी ७५ लाख रुपयांची वाढ सुचविण्यात आली आहे,त्यामुळे जिल्ह्याचा प्रारुप आराखडा २०० कोटी रुपयांचा झाला आहे.अनुसूचित जाती उपयोजनेसाठी वित्त विभागाने ३० कोटी २५ लाख रुपयांची मर्यादा निश्चित केली होती.या योजनेतही १७ कोटी ७६ लाख ९२ हजार रुपयांची वाढ सुचविण्यात आल्यामुळे हा आराखडा ४८ कोटी १ लाख ९२ हजार रुपयांचा झाला आहे.आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील आदिवासी योजनेसाठी ४६ लाख २२ हजाराचा प्रारुप आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे.या तीनही योजनांचा एकूण निधी २४८ कोटी ४८ लाख १४ हजार इतका झाला आहे.
अनुसूचित जाती उपयोजनेत २०११-१२ या वर्षात कृषि व संलग्न सेवेसाठी ५ कोटी १३ लाख २० हजार रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.ग्रामीण विकासासाठी ८ कोटी ४६ लाख,सामान्य शिक्षणासाठी ४३ लाख ६८ हजार,क्रीडा व युवक कल्याण यासाठी ८८ लाख इतका निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.सामाजिक व सामुहिक सेवेतील गृह निर्माण,नगर विकास,मागासवर्गीयांचे कल्याण,कामगार कल्याण,समाज कल्याण यासाठी ३० कोटी २५ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
नाविन्यपूर्ण योजनांसाठी ६ कोटी ६९ लाख
कृषि व संलग्न सेवेसाठी २०११-१२ या वर्षात २९ कोटी ६४ लाख १० हजार रुपयांचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे,तर ग्राम विकासासाठी ३१ कोटी ६४ लाख ६४ हजार रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.सामाजिक सेवेसाठी ५९ कोटी २४ लाख ६८ हजार तर परिवहन योजनांसाठी ३७ कोटी ७९ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.पाटबंधारे व पूर नियंत्रणासाठी १४ कोटी ६५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे,तर ऊर्जा क्षेत्रासाठी ५ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.उद्योग व खाण काम यासाठी ३ कोटी ७७ लाख,सार्वजनिक कार्यालय व पायाभूत सुविधा,माहिती व प्रसिध्दी यासाठी २ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.इतर जिल्हा योजनेत जिल्हा नियोजन समितीचे बळकटीकरण,जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण योजनांसाठी ६ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
नाविण्यपूर्ण योजनेत वन,विज्ञान,तंत्रज्ञान व पर्यावरण,अनाथ मुलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण,आयएएस स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन,लेक वाचवा अभियान,जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयांचे आयएसओ मानांकन,तलाठी प्रशिक्षण,साहसी खेळांचा प्रसार व प्रचार,जिल्ह्यातील बारा तालुक्यातील प्रत्येकी एका महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्ग सुरु करणे,शेतकर्‍यांसाठी हेल्प लाईन,ग्रामीण रुग्णालयांना टेलिमेडिसीन व डायलेसीस, जिल्ह्यात आयटी परिषद भरविणे,अपंगांना उपकरणे आदि २१ नाविण्यपूर्ण योजनांसाठी ६ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

२०१०-११ सालासाठी १६ कोटी रुपयांचे पुनर्वाटप

सन २०१०-११ या वर्षातील विविध विभागांची मागणी लक्षात घेऊन १६ कोटी ३ लाख रुपयांचे पुनर्वाटप करण्यास या बैठकीत मंजुरी देण्यात आली.गाभा क्षेत्रासाठी ११ कोटी ३८ लाख ७४ हजार तर बिगर गाभा क्षेत्रासाठी ४ कोटी ६४ लाख २८ हजार रुपयांचे पुनर्वाटप करण्यात आले.गाभा क्षेत्रातील कृषि व संलग्न सेवा,ग्रामविकास,सामाजिक सेवा व नाविण्यपूर्ण योजनांसाठी या निधीचे पुनर्वाटप करण्यात आले.सन २०१०-११ या वर्षात सर्वसाधारण वार्षिक योजनेत मंजुर झालेल्या १४२ कोटी ५ लाख रुपयांपैकी प्रत्यक्ष १०४ कोटी ५७ लाख ५६ हजार इतका निधी प्राप्त झाला होता,या प्राप्त तरतुदीपैकी ८८ लाख ८१ हजार ६५ रुपये इतका निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित करण्यात आला आहे.वितरित निधीपैकी ४३ लाख ४७ हजार इतका खर्च झाला आहे.अनुसूचित जाती उपयोजनेत २२ कोटी ९५ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते,त्यापैकी १३ कोटी ७५ लाख ६२ हजार रुपये अर्थसंकल्पित करण्यात आले,तर ९ कोटी ९५ लाख इतका निधी प्राप्त झाला.वितरित निधीपैकी ७२ टक्के निधी खर्च करण्यात आला आहे.आदिवासी योजनेच्या खर्चाची टक्केवारी ५१ टक्के इतकी आहे.
नाविण्यपूर्ण योजना
सन २०१०-११ या वर्षात घ्यावयाच्या नाविण्यपूर्ण योजनांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली.या नाविण्यपूर्ण योजनेत पश्चिम घाटातील महत्वाच्या औषधी वनस्पती प्रजातीचे वृक्षालय जतन करणे,१२१ प्रकारच्या औषधी वनस्पती वृक्षांची लागवड करणे यासाठी २३ लाख ४० हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.जिल्ह्यातील तहसिल कार्यालयांमध्ये सौर साधनांचा कार्यक्रम राबविण्यासाठी ४७ लाख तर जिल्हा माहिती कार्यालयाचे सक्षमीकरण करण्यासाठी ४५ लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत.ग्रामीण भागातील महिला सदस्यांचे सबलीकरण व प्रशिक्षणासाठी ३० लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत.महिला सबलीकरणामध्ये जिल्हा परिषदेच्या २६ महिला सदस्य,पंचायत समितीच्या ५२ महिला सदस्य,३३० महिला सरपंच व ९५२ ग्रामपंचायत महिला सदस्यांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.
मिशन कोल्हापूर गोल्डसाठी १ कोटी रुपये
मिशन कोल्हापूर गोल्ड या खेळाडू घडविणार्‍या नाविण्यपूर्ण योजनेसाठी प्रती वर्षी २५ लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात येणार आहे.पुढील चार वर्षात या योजनेवर १ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
.
प्रारंभी प्रभारी जिल्हाधिकारीᅠतुकाराम कासार यांनी स्वागत केले.जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हंबीरराव मोहिते यांचे निधन झाल्याबद्दल त्यांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.

शाहू स्मारकाच्या निमित्ताने....


विकासाचे मोजमाप भौतिक विकासावर होत नसते. उंच इमारती, उड्डाणपूलं, उद्योगधंदे यासारख्या भौतिक विकासातून माणसाचा जीवनस्तर किंवा आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होत असते परंतू अशा विकासाला सर्वांगिण विकास म्हणता येणार नाही. जीवनाचा आर्थिक स्तर उंचावण्याबरोबरच समाजात सांस्कृतिक मुल्यांची देवाणघेवाण कशा पध्दतीने होत आहे ? सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत आणि या प्रयत्नातून समाज जीवन समृध्द होत आहे की नाही हे तपासणे महत्वाचे आहे. सांस्कृतिक संवर्धनासाठी व्यासपीठ निर्माण करुन कला, साहित्य व संस्कृतीला उत्तेजन देणं ही पुढारलेल्या समाजाची लक्षणे आहेत. हातात महागडा मोबाईल, महागडी कार आणि छानशा अपार्टमेंटमध्ये राहण्यास माणूस समाजाशी जुळलेला असतोच असे नाही किंवा त्याच सांस्कृतिक विकास झाला आहे असेही म्हणता येत नाही. समाजातील प्रत्येक घटकाला सर्वांगीण विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम हे सांस्कृतिक विकासाच्या माध्यमातून होत असते, म्हणूनच सांस्कृतिक धोरणाची गरज आहे. राज्य शासनाने राज्याच्या औद्योगिक प्रगतीएवढेच महत्व सांस्कृतिक धोरणाला दिले आहे. राज्यातल्या गावा-गावात,वाड्या-वस्त्यांवर राहणार्‍या समाजाला एकसंघ ठेवण्याचे माध्यम म्हणजे सांस्कृतिक विकास होय. कला, साहित्य आणि संस्कृती यातून माणसाची जडणघडण करणे हे अत्यंत महत्वाचे आहे.
कोल्हपूर म्हणजे खर्‍या अर्थाने कलापूर होय. इथली प्रत्येक गोष्ट प्रत्येक हालचाल ही कलेशी जोडली गेली आहे. आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना आपली अस्सल मराठी ओळख कोल्हापुराने कधीही विसरली नाही. इथली सांस्कृतिक चळवळ आजही इतरांच्या आकर्षणाचा विषय आहे. पुण्यात आय. टी. कल्चर रुजल्यामुळे पुण्याची संस्कृती धोक्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूरात आय. टी उद्योग नकोत अशा आशयाचा एक ई-मेल पुण्यात काम करणार्‍या एका तरुणाने पाठविला होता. परंतु कोल्हापूरी कल्चर अशा भौतिक विकासामुळे नष्ट होईल असे मला वाटत नाही कारण औद्योगिक विकास साधताना सांस्कृतिक विकासासाठीही समांतर प्रयत्न शासन दरबारी होत आहेत. साहित्यिक पिंड व संवेदनशील असलेले जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी जे प्रयत्न सुरु केले आहेत त्याची दखल घेणे क्रमप्राप्त आहे. जिल्ह्यात उद्योगधंदे वाढावेत, आय. टी. उद्योग यावेत, बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी पूणे, बेंगलोर येथे कोल्हापूरचे मार्केटींग त्यांनी केले. कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी ते शेतकर्‍यांसमवेत चर्चेसाठी बसले आणि त्यांना मान्य असलेला दर ठरवूनच ते उठले. शासन दरबारीही विमानतळ विस्तारीकरणासाठी मुबलक निधी मिळाला. विभागीय क्रीडा संकूल मंजूर झाले. तालुका स्तरावरही क्रीडा संकूले आकार घेत आहेत. यासर्व प्रयत्नाबरोबरच राजर्षी शाहू जन्मस्थळ विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मिळविला. या गोष्टी करीत असताना सामाजिक जाणिवेतून त्यांनी स्त्री-भ्रूण हत्येसारखा विषय यशस्वीपणे हाताळला. भविष्यात मुलींचे प्रमाण जर वाढले तर त्याचे श्रेय निश्चितच देशमुख साहेबांना द्यावे लागेल.
कोल्हापुराच्या सांस्कृतिक विकासातही देशमुख साहेबांनी महत्वपूर्ण कार्य केले आहे. कोल्हापूर महोत्सवाबरोबरच दोन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन त्यांनी केले. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी सुरु केलेला शाहू स्मारकाचा कायापालट. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली ही इमारत आता तीन मजली झाली आहे. सूसज्ज ग्रंथालय, आर्ट गॅलरी, सभागृह आदी सुविधा आत नव्याने कला रसिकांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. गेली अनेक वर्ष शाहू स्मारकाच्या विकासाचा प्रश्न कोणीही बोलून दाखविला नव्हता, केवळ देशमुख साहेबांच्या दूरदृष्टीतून शाहू स्मारक नव्या स्वरुपात आकार घेत आहे. शाहू स्मारक भवन म्हणजे कला रसिकांचे मुक्त व्यासपीठ. सांस्कृतिक चळवळीचे अधिष्ठान असलेल्या या इमारतीमध्ये आता छत्रपती शाहूंना अभिप्रेत असलेली व्यासपीठे आकार घेणार आहेत. राजर्षी शाहूंनी ज्या कलांना उत्तेजन व राजाश्रय दिला त्या कलांचे व्यासपीठ याठिकाणी असणार आहे. क्रीडा क्षेत्र यामध्ये नाही कारण तेवढी जागा याठिकाणी उपलब्धही नाही. माणसाकडे जर कल्पनाशक्ती असेल तर बदल हा अपरिहार्यच असतो असे म्हटले जाते. सतत नव-नव्या कल्पना मांडून त्या प्रत्यक्षात साकारण्याचे सामर्थ्य देशमुख साहेबांकडे आहे म्हणूनच कोल्हापूर जिल्हा आज आपली वेगळी प्रतिमा निर्माण करु लागला आहे. २६ जून या राजर्षी शाहूंच्या जन्मदिनी नव्या स्वरुपातील शाहू स्मारक भवन सर्वासाठी खुले होणार आहे. या स्मारकाच्या उभारणीत सर्व कला-रसिकांचे योगदानही तेवढेच मोठे आहे. यापुढील काळात शाहू स्मारक शहराला सांस्कृतिक विकासाची दिशा देईल यात शंका नाही. त्याची देखभाल करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. शाहू स्मारक ही एक विश्वस्त संस्था आहे. आणि ज्या शाहू महाराजांनी आपल्या पुरोगामी विचारातून देशाला दिशा दिली. त्यांच्या विचारांचे जतन व सांस्कृतिक संवर्धनाला गती देण्याचे काम शाहू स्मारकाच्या माध्यमातून होत आहे. या विश्वस्त संस्थेच्या विश्वस्त पदावर देशमुख साहेबांनी डॉ सुनीलकुमार लवटे, डॉ. जयसिंगराव पवार व डॉ. अशोक चौसाळकर यांची नियुक्ती करुन शाहू स्मारकाच्या कार्याला नवी दिशा दिली आहे. पुरोगामी विचारांच्या छत्रछायेत वाढलेले देशमुख साहेब तळमळीने व जाणिवेने व पुरोगामी विचारानेच काम करीत आहेत यात कसलीच शंका घेण्याचे कारण नाही. त्यांच्या कार्याला आपण पाठबळ देऊ या.


दयानंद कांबळे

२६ ते ३० जानेवारी दरम्यान कोल्हापूर महोत्सवाचे आयोजन


up coming event - KOLHAPUR Mahostav 2011
on 26th January to 30th January 2011



कोल्हापूर महोत्सवाचे आयोजन दि.२६ ते ३० जानेवारी २०११ या कालावधीत होणार आहे.दि.२६ जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून लेसर शो कार्यक्रमाने महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर महोत्सव आयोजनासंदर्भात जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी प्राथमिक बैठक आयोजित केली होती.या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर,उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर,अतिरिक्त पोलीस अधिक्षक संजयसिंह ऐनापुरे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जावा यासाठी गेल्या चार वर्षापासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.यावर्षी पाच दिवस हा महोत्सव चालणार आहे.महाराष्ट्रातील पर्यटक कोल्हापूरकडे वळावेत यासाठी यंदा विशेष प्रयत्न करण्यात येत असून महाराष्ट्रातील मोठ्या जिल्हयांमधून व्यापक प्रसिध्दी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.टूर ऑपरेटर्स,हॉटेल व्यावसायिक यांच्या सहकार्याने विशेष पॅकेज सहली आयोजित करण्यासंदर्भात यावेळी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमाबरोबरच इतर व्यावसायिक कलाकारांचे कार्यक्रम या महोत्सवात आयोजित करण्यात येत असून लवकरच कार्यक्रमाची रुपरेषा जाहिर करण्यात येईल.या महोत्सवात तेजस्विनी सावंत,राही सरनोबत,वीरधवल खाडे व सुहास खामकर या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.



बायोगॅस उभारणीत कोल्हापुरची आघाडी



कोल्हापूर जिल्हा बायोगॅस उभारणीत अग्रेसर रहावा यासाठी जिल्ह्यात सर्व ठिकाणी बायोगॅस सयंत्राचे वाटप करुन जिल्ह्यातील गरीब शेतकर्‍यांना याचा लाभ मिळावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या जिल्ह्यात बायोगॅस सयंत्र ही योजना राबविण्यात येत आहे.शेतकर्‍यांनीही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे चित्र आजकाल दिसू लागले आहे.सन १९८२-८३ पासून महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय बायोगॅस योजनेस बायोगॅस सयंत्र बांधणा-या लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येते.ही योजना कोल्हापूर जिल्ह्यात अधिक प्रभावी ठरली असून जिल्ह्यात आजतागायत ८७ हजार ८५२ बायोगॅस सयंत्राचे बांधकाम शौचालयासह पूर्ण झाले असून विशेष म्हणजे २००८-०९ या वर्षामध्ये राज्याच्या एकूण १७ हजार उद्दिष्टापैकी निम्मे म्हणजे साडेआठ हजार सयंत्राचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्हा हा निर्मल जिल्हा बनावा यासाठी जिल्हा परिषदेने प्रमुख उद्देश ठेवून ही योजना अतिशय प्रभावीपणे राबविली आहे.या सयंत्राच्या बांधकामासाठी लागणा-या विटा,वाळूसिमेंट आदी साहित्यात वाढ झाल्यामुळे यासाठी असणार्‍या चार हजार अनुदानात दुप्पटीने वाढ करुन गतवर्षीपासून हे अनुदान नऊ हजार रुपये करण्यात आले आहे.दरम्यान या योजनेतून लाभार्थ्यांने एक वेळा अनुदान घेतल्यास पुनर्बांधणीसाठी फेरअनुदान देण्याची तरतूद नव्हती.परंतु या सयंत्राचे आयुष्यमान २० ते २५ वर्षे पर्यतच असते.त्यामुळे हे सयंत्र नादुरुस्त झाल्यास अनुदानाअभावी गरीब लाभार्थ्यांकडून पुन्हा बांधले जात नव्हते.याचा केंद्ग सरकारच्या बायो एनर्जी विभागाकडून विचार होऊन पुनर्बांधणीसाठी अनुदान देण्याचा विचार पुढे आला आहे.विशेष म्हणजे सयंत्राच्या बांधणीसाठी लागणार्‍या अनुदानाच्या वाढीसह आयुष्य मर्यादा ठरवून पुनर्बांधणीसाठी अनुदान देण्याचा प्रस्तावही कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी विभागाकडून करण्यात आला होता.
राष्ट्रीय बायोगॅस सयंत्र योजनेअंतर्गत शासनामार्फत शौचालयासह बायोगॅस सयंत्र (गोबर गॅस) बांधण्यासाठी सहा महिन्यापूर्वी अनुदानात दुप्पट वाढ करण्यात आली.मात्र एकवेळा अनुदान घेणार्‍या लाभार्थ्यांस पुनर्बांधणीसाठी अनुदान मिळत नव्हते.याबाबत पुर्नविचार होऊन नवी दिल्ली येथील डायरेक्टर ऑफ बायो एनर्जी यांच्या कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत बायोगॅस सयंत्राची आयुष्य मर्यादा १५ ते २० वर्षे ठरवून पुनर्बांधणीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.याबाबत जिल्हा परिषदेस आदेश प्राप्त होणार असून या निर्णयामुळे जिल्ह्यातील ८७ हजार ६५२ बायोगॅस सयंत्राना पुनर्जिवन लाभणार आहे.
जिल्ह्यात गतवर्षी २ हजार बायोगॅस सयंत्र बांधणीचे उद्दिष्ट असून जिल्ह्याचे योगदान पाहता यंदा जिल्ह्याला पाच हजार सयंत्र बांधणीसाठी अनुदान मिळणार आहे.त्यामुळे जिल्ह्यात मागेल त्याला बायोगॅस सयंत्र मिळणार असल्याचा विश्वास कृषि विभागाकडून सांगण्यात येत आहे.

जिल्हा माहिती कार्यालय

सेव्ह द बेबी गर्लला द.आशिया स्तरावरचा मंथन पुरस्कार 20/12/2010


  • कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या सेव्ह द बेबी गर्ल या उपक्रमास दक्षिण आशिया स्तरावरचा प्रतिष्ठीत मंथन पुरस्कार मिळाला आहे.२०१० सालातील सर्वोत्कृष्ट संशोधनात्मक प्रयोग म्हणून या उपक्रमास हा पुरस्कार मिळाला आहे.नॅसकॉम, ई-इंडिया या पुरस्कारानेही सेव्ह द बेबी गर्ल उपक्रमास यापूर्वीच गौरविले आहे.मंथन पुरस्कारामुळे सेव्ह द बेबी गर्ल हा उपक्रम पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे.या पुरस्काराचे वितरण नवी दिल्ली येथे नुकतेच करण्यात आले.
    दक्षिण आशिया स्तरावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या उपक्रमांना हा पुरस्कार देण्यात येतो.अफगानीस्तान,बांगला देश,भूतान,भारत,मालदिव,नेपाळ,श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांतील माहिती तंत्रज्ञानावर आधारित शंभरहून अधिक उपक्रम मानांकित करण्यात आले होते.ई-शिक्षण,ई-मनोरंजन,ई-पर्यटन,ई-व्यवसाय व व्यापार,ई-आरोग्य,ई-पर्यावरण,ई-विज्ञान,ई-शेती अशा वर्गवारीमध्ये राबविण्यात आलेल्या माहिती तंत्रज्ञान उपक्रमास मंथन पुरस्कार देण्यात येतो.
    सेव्ह द बेबी गर्ल या उपक्रमास ई-आरोग्य (हेल्थ) या वर्गवारीमध्ये मानांकन मिळाले होते.१८ डिसेंबर २०१० रोजी नवी दिल्ली येथे एका समारंभात पुरस्काराची घोषणा करण्यात आली.ई-आरोग्य या उपक्रमांतर्गत त्रिपुरा राज्याच्या त्रिपुरा व्हिजन सेंटर या उपक्रमास मंथन पुरस्कार देण्यात आला तर सेव्ह द बेबी गर्ल या उपक्रमास सर्वोत्कृष्ट संशोधनात्मक प्रयोग म्हणून पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी स्वीकारला.

    मंथन पुरस्कार माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय,नवी दिल्ली तसेच डिजीटल एम्पॉवरमेंट फौंडेशन,आयएमआय मोबाईल,मोबिलीटी फंड,इंटेल यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जातो


'लखपती माझी कन्या 'अभियानात सहभागी व्हा..! -- जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन



दारिद्गय रेषेखालील व मागासवर्गीय घटकांतील कुटुंबात जन्मास येणार्‍या प्रत्येक मुलींमागे ६ हजार रुपयांची ठेव जमा करुन लखपती माझी कन्या या अभियानात सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती व सरपंचांना केले आहे

जिल्हा प्रशासनाने सेव्ह द बेबी गर्ल,सायलेंट ऑब्झर्व्हर,लिंगनिदान प्रतिबंध अशा विविध उपक्रमांव्दारे जिल्ह्यातील हजार पुरुषांमागे स्त्रियांचा जन्मदर ८३९ वरुन ८७५ इतका नेण्यात यश मिळविले. या प्रयत्त्नांमुळे व प्रबोधनामुळे पुढील काळात मुलींचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे.जन्माला आलेल्या मुलींचे स्वागत करणे,तीचे शिक्षण करुन तिला स्वावलंबी व सुजाण बनविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने लेक माझी लखपती या सामाजिक अभियानात जिल्ह्र्यातील सर्व सरपंचांनी सहभागी होण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी आवाहन केले आहे.जानेवारीᅠ२०११ पासून दारिद्गय रेषेखालील व मागासवर्गीय कुटुंबात जन्मास येणार्‍या प्रत्येक मुलींमागे दरवर्षी २ हजार रुपयांप्रमाणे ३ वर्षे एकूण ६ हजार रुपये भरले तर बजाज अलायन्स कंपनीतर्फे रुपये ४० हजार रुपयांचे विमा संरक्षण व रुपये ६० हजारांची रक्कम मुलीच्या २१ साव्या वर्षी देता येईल.त्यातून तिचा पुढील शिक्षणाचा व लग्नाचा खर्च गरीब कुटुंबास भागविता येईल. अशा तर्‍हेने गरीब कुटुंबास मदत केली तर ते मुलीच्या जन्माचे निश्चित स्वागत करतील.लिंग निदान करुन मुलीचा गर्भपात करणार नाहीत व तिला किमान १२ वी पर्यंत शिकवू शकतील.यासाठी हे अभियान जानेवारी २०११ ते डिसेंबर २०१५ पर्यंत राबवून जिल्ह्यातील स्त्री जन्माचे प्रमाण हजार पुरुषांमागे ९५० पेक्षा जास्त होईल,अशी अपेक्षाही जिल्हाधिकार्‍यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

यासाठी ग्रामसभेची व ग्रामपंचायत सभेची मंजूरी घेऊन प्रत्येक मुलींसाठी ६ हजार रुपये ३ वर्षात जिल्हा प्रशासन ठरवेल त्या कंपनीत गुंतवावे लागणार आहेत. याकरिता ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून ५० हजार रुपयांपर्यंत किंवा (जितकी शक्य आहे तेवढी रक्कम) उपलब्ध करणे,गावातील दुध संस्था,पतसंस्थाकडून रुपये हजार-दोन हजार प्रत्येक जन्मणार्‍या मुलींमागे घेणे,गावातील दानशूर श्रीमंतांकडून देणगी घेणे,त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या नांवे एक वेगळे खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडून त्यात प्रत्येक जन्मणार्‍या मुलींमागे ६ हजार रुपये जमा करणे व दरवर्षी २ हजार रुपये कंपनीस चेकने आदा करावेत,अशा मार्गाने ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करुन लखपती माझी कन्या अभियानात सहभागी होणे सहज शक्य आहे.

लखपती माझी कन्या या अभियानात सहभागी होण्याचे कळकळीचे आवाहन करुन जिल्हाधिकार्‍यांनी डिसेंबर अखेर अभियानात सहभागी होण्याबाबत ठराव करुन तो ठराव गावातील तलाठयाकडे द्यावा,असे सरपंचांना पत्राव्दारे कळविले आहे.
savethebabygirl

क्रीडा संकुलाच्या पहिल्या टप्प्यातील कामे मार्च अखेर पूर्ण करावीत-जिल्हाधिकारी




विभागीय क्रीडा संकुलाच्या बांधकामाचा दर्जा उत्तम आणि दर्जेदार राखून पहिल्या टप्प्यातील कामे मार्च २०१० अखेर पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज आढावा बैठकीत दिल्या.
विभागीय क्रीडा संकूल समितीच्यावतीने क्रीडा संकूल बांधकामाच्या कार्यस्थळी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीस क्रीडा संचालक नरेंद्ग सोपल,महापालिका उपायुक्त ओमप्रकाश दिवटे,क्रीडा उपसंचालक नरेंद्ग देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
क्रीडा संकुलाच्या बांधकामाबाबत आढावा घेऊन पहिल्या टप्प्यातील उर्वरित कामांच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी म्हणाले,क्रीडा संकुलाच्या पहिल्या टप्प्यात जलतरण तलाव,लॉन टेनीस कोर्ट,अ‍ॅथलेटिक ट्रॅक,फुटबॉल मैदान आणि अंतर्गत रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्णत्वास नेतांना या कामांचा दर्जा उत्तम राहील याची संबंधितांनी योग्य ती दक्षता घ्यावी.कोल्हापुरातील नेमबाजांनी राष्ट्रकुल स्पर्धेबरोबरच देशांतर्गत झालेल्या स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी पार पाडल्याने पहिल्या टप्प्यामध्ये शुटिंग रेंजची उभारणी करण्यात येत आहे.यामध्ये १० मीटर,२५ मीटर व ५० मीटरची अद्ययावत अशी शुटिंग रेंज निर्माण करण्यात येत असून १० मीटर शुटिंग रेंजसाठी इलेक्ट्रॉनिक स्कोअर बोर्ड या ठिकाणी बसविण्यात येईल.
फुटबॉल मैदानाच्या सभोवती संरक्षक भिंत व प्रेक्षक गॅलरीची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगून श्री.देशमुख म्हणाले,कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.क्रीडा संकुलाचा दर्जा वेळोवेळी तपासण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या संमतीने क्रीडा तज्ञांची समिती निश्चित करण्यात येईल.वास्तुविशारद,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व बांधकाम कंत्राटदार यांनी समन्वयाने क्रीडा संकुलाच्या कामाचा पाठपुरावा करावा अशा सुचनाही जिल्हाधिकार्‍यांनी बैठकीत दिल्या.
तत्पूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी विभागीय क्रीडा संकुल समिती समवेत क्रीडा संकुलाच्या बांधकामाची पाहणी केली.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप शेलार,डीआरडीएचे प्रकल्प संचालक डॉ.प्रमोद शिंदे,जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्ग घाडगे,क्रीडा अधिकारी अरुण पाटील,वास्तुविशारद प्रमोद पारेख,बांधकाम कंत्राटदार सारंग जगताप,विजय सासने उपस्थित होते

अपंग खेळाडुंसाठी मिशन कोल्हापूर गोल्ड अपंग व्यक्तीनिर्मित वस्तुंसाठी विक्री केंद्ग उभारणार






प्रतिभावंत खेळाडुंसाठी प्रेरणादायी ठरणार्‍या कोल्हापूर मिशन गोल्ड योजनेत पॅराऑलिंपिक स्पर्धांसाठी किमान ५ अपंग खेळाडुंच्या शिक्षण,क्रिडा प्रशिक्षण व परदेश दौर्‍याकरिता विशेष तरतूद केली जाईल,तसेच अपंग व्यक्ती,विद्यार्थी व संस्थांनी तयार केलेल्या विविध वस्तुंसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कायमस्वरुपी विक्री केंद्ग सुरु केले जाईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली.
५० व्या जागतिक अपंग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन व चेतना अपंगमती विकास संस्थेच्यावतीने अपंगांच्या कला अविष्कारासाठी आयोजित यारे-सारे-या या चेतनामय आनंद मेळ्याच्या उद्‌घाटन प्रसंगी श्री.देशमुख बोलत होते.शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.जे.पवार,समाज कल्याण अधिकारी सौ.वृषाली शिंदे,जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती गोपाळ कांबळे,प्राचार्य पवन खेबुडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
अपंग बांधवांसाठी आयोजित केल्या जाणार्‍या अशा आनंद मेळ्यातून एक अनोखी प्रेरणा व उमेद मिळेल.निव्वळ सहानुभूती न दर्शविता अपंगांना मेत्रीचा हात पुढे करुन त्यांना मैत्री,आस्था,प्रेम व आधार द्यावा.जिल्ह्यातील सर्व अपंगांच्या शाळा व संस्थानी एकत्रित येवून उत्तम नेटवर्क उभारले तर त्यांच्या समस्यांचे निराकरण,शासकीय मदत,नवे उपक्रम यात सुसुत्रता येईल.
अपंगांच्या अशा आनंद मेळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून ५ लाख रुपयांची तरतूद करण्याबाबत प्रयत्न केले जातील असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले,अपंगांनी केलेल्या विविध वस्तु,शैक्षणिक व कार्यालयांसाठी बनविलेली साधने यांच्या विक्रीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विक्री केंद्ग उभारले जाईल.
कुलगुरु डॉ.एन.जे. पवार म्हणाले,आनंद मेळ्यातून अपंग विद्यार्थ्यांनी सादर केलेले कलाविष्कार पाहिले तर या विद्यार्थ्यांना अपंग न म्हणता विशेष अंग व विशेष क्षमता धारण केलेले विद्यार्थी म्हणणे उचित ठरेल.अशा प्रकारच्या आनंद मेळ्याचे स्वरुप विस्तृत झाल्यास अपंग विद्यार्थ्यांचे कलागुण जगापुढे येण्यास मदत होईल.
उद्योजक मोहन घाटगे यांनी समाजाने सहानुभूतीपेक्षा अपंगांना सर्व प्रकारचे पाठबळ द्यावे.विप्रो या प्रसिध्द कंपनीचे सर्वेसर्वो अझिज प्रेमजी यांनी अपंग कल्याणासाठी ८ हजार कोटींची भरीव मदत केल्याचे सांगून श्री.घाटगे यांनी जिल्ह्यातील उद्योजक व उद्योग संस्थांनी अपंग कल्याणासाठी आर्थिक पाठबळ द्यावे असे आवाहन केले.
जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती गोपाळ कांबळे यांनी अशा प्रेरणादायीᅠकार्यक्रमांचे आयोजनासाठी सहाय्य केले जाईल असे सांगितले.समाज कल्याण अधिकारी सौ.वृषाली शिंदे यांनी अपंग कल्याणासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.प्रास्ताविकात प्राचार्य पवन खेबुडकर यांनी आनंद मेळ्याच्या आयोजनाची माहिती देवून अपंगांच्या समस्यांचा आढावा घेतला.
प्रा.पवन खेबुडकर लिखित यारे-सारे-या या गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केला.ज्ञान प्रबोधन अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.यावेळी मूकबधीर शाळा तिळवणीच्या विद्यार्थ्यांनी देश रंगीला रंगीला,सन्मति मतिमंद मुलांची शाळा,इचलकरंजीच्या विद्यार्थ्यांनी गोंधळ तर वि.म.लोहिया मूक बधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम्‌ गीतावर आकर्षक नृत्य करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.
यावेळी पॅराऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या मंजिरी कुलकर्णी-(सायकल स्पर्धा) केदार देसाई-(पॉवर लिफ्टींग),रोहित पांढरे (रोलर स्केटिंग) या अपंग खेळाडुंचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी अंधविद्यार्थीनी कु.सुनिता सनदी,कर्णबधिर विद्यार्थीनी कु.ज्योती कांबळे,अपंग विद्यार्थी वैभव जोगळेकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.मान्यवरांच्या हस्ते जिल्हयातील विविध अपंग शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी सकाळी ९ वाजता रन फॉर डिसॅबिलीटी या मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.लकी बाजार येथून मॅरॅथॉनला प्रारंभ झाला.राजारामपुरी,जनता बझार,फोर्ड कॉर्नर,बिंदू चौक मार्गे जाऊन प्रायव्हेट हायस्कूल येथे मॅरॅथॉनची सांगता झाली.मॅरेथॉन स्पर्धेत तिळवणीच्या रोटरी कर्ण बधिर विद्यालयाच्या वैभव जाधव याने प्रथम तर याच विद्यालयाचा अरुण रावळ याने द्वितीय आणि कोल्हापुरच्या बाल कल्याण संकुलच्या अजित पाटील याने तृतीय क्रमांक पटकाविला.मुलींमध्ये वि.म.लोहिया मुक बधिर विद्यालयाची श्रध्दा जमादार हिने प्रथम,उषाराजे हायस्कूलच्या प्रियांका चव्हाण हिने द्वितीय तर याच हायस्कूलच्या निकिता गवळी हिने तृतीय क्रमांक पटकाविला.दि.३ ते ५ डिसेंबरपर्यंत चालणार्‍या आनंद मेळाच्या निमित्ताने अपंगांनी बनविलेल्या विविध गृहपयोगी व कलात्मक वस्तुंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.फनफेअर,पपेट शो,मॅजिक शो,कलाविष्कार आणि विविध खाद्य पदार्थाचें स्टॉलस्‌ आनंद मेळाचे आकर्षण ठरले आहे.
आनंद मेळ्यास जिल्हयातील विविध अपंग व मूक बधिर शाळा,अपंग कल्याण संस्था,अपंग विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन सोनाली नवांगूळ तर आभार दिलीप बापट यांनी केले.


कोल्हापुरातील १०२ ग्रामपंचायतींचा खेल अभियान योजनेत समावेश






कोल्हापूरने अनेक दिग्गज खेळाडू देशासाठी दिले आहेत. सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत हे अलिकडचेच उदाहरण देता येईल. ही परंपरा अशीच पुढे चालू राहण्यासाठी पंचायत युवा क्रीडा व खेळ योजना व जिल्हा नियोजन मंडळ यांच्यामार्फत ३ लाख रूपये जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत.

कला, क्रीडा, साहित्य आणि संस्कृती या सर्व क्षेत्रांत कोल्हापूर आघाडीवर आहे. राजर्षी शाहूंचा वारसा जतन करणार्‍या कोल्हापुरातील युवाशक्ती संस्कारित होऊन क्रीडा परंपरा जतन करण्यासाठी पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान योजनेअंतर्गत खेळाच्या पायाभूत सुविधा विकसित
करून क्रीडा संस्कृती अगदी खोलवर रूजावी या उद्देशाने हे अभियान कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

Kolhapur Dasara 2010



























































A AMBE
B BHAVANI
C CHAMUDI
D DURGA
E EKRUPI
F FARSADHARNI
G GAYATRI
H HINGLAAJ
I INDRANI
J JAGDAMBA
K KALI
L LAXMI
M MATTA
N NARAYANI
O OMKARINI
P PADMA
Q QATYAYANI
R RATNAPRIYA
S SHAKTI
T TRIPURA SUNDARI
U UMA
V VAISHNAVI
W WARAHI
Y YATI
Z ZYANA

HAPPY NAVRATRI...